
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४
Edit
मुंबई: “धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षा भूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद,
अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना
अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये,
यासाठी मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी केली आहे,” अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.