सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती
या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा होती. अनेक महिला नेत्यांनी हे पद आपल्याला मिळावे, म्हणून सुनेत्रा पवारांना साकडे घातले होते.मात्र, अखेर त्यांनी वैशाली नागवडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची नियुक्ती केली.
अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासह महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे मार्च महिन्यापासून ही दोन्ही पदे रिक्त होती. अखेर प्रदेशाध्यक्षपदी नायवडे यांची नियुक्ती करण्यात आली.
१९९९ मध्ये कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या कामानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नागवडे कुटुंबीयांची परिचय झाला. त्यानंतर वैशाली नलावडे यांची २००२ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली.
२००५ मध्ये महानंदाच्या संचालिका ,२००७ मध्ये पंचायत समिती दौंडच्या सदस्यपदी, २००९ मध्ये राष्ट्रवादी पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा ,याच वर्षी महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. २०१० मध्ये दुसऱ्यांदा महानंदाच्या संचालकपदी निवड झाली व २०१३ मध्ये राज्याच्या महानंदाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. याच वर्षी IVRI - बरेली , उत्तर प्रदेश या संस्थेच्या डायरेक्टर झाल्या.
चाकणकारांच्या विरोधात भूमिका
वैशाली नागवडे या मुळच्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील आहेत, सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्षपद आणि प्रदेश सरचिटणीसपद भूषवले आहे.
पक्षाचा महिला आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. २०१७ आणि २०२० मध्ये पक्षाकडून त्यांनी राहू-खामगावमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्यांना अजित पवार यांना महानंदा दूधच्या चेअरमन पदाची धुरा देखील सोपवली होतीच पक्षात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात अनेक वेळा भूमिका घेतल्याने त्या चर्चेत होत्या.