
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
पीएम-किसान सन्मान निधी योजनेचे टॉप टेन लाभार्थी जिल्हे
जिल्हा लाभार्थ्यांची वितरित
संख्या रक्कम
सोलापूर ५,०५,१७२ ११०.२२
अहिल्यानगर ५,५२,२४६ ११७.२७
कोल्हापूर ४,८५,२३९ १०८.९६
सातारा ४,५३,००७ ९९.८
पुणे ४,४६,५४५ ९४.५८
नाशिक ४,४२,६०६ ९४.०२
जळगाव ४,०९,५१७ ९०.४४
सांगली ४,००,३७४ ८४.२
नांदेड ३,८६,२९२ ८०.४२
बीड ३,८०,६९९ ८३.४९
एकूण महाराष्ट्र ९३,२८,२८६ २,०१३.५१
पीएम-किसान लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार
ठाणे
जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी फक्त ७४,०५१ लाभार्थ्यांची नोंद आहे.
पालघरमध्ये आदिवासी व ग्रामीण लोकसंख्या लक्षणीय असूनही १.०१ लाख लाभार्थी
नोंदले गेले आहेत. याउलट सोलापूर ५.०५ लाख लाभार्थ्यांसह अव्वल आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्यात ११० कोटींपेक्षा जास्त रक्कम
मिळाली आहे.
आजवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३७,००० कोटी रुपयांहून
अधिक रक्कम वितरित करण्यात आली. त्यामुळे पीएम-किसान लाखो शेतकऱ्यांसाठी
मोठा आधार बनला आहे. आता आदिवासी आणि दुर्गम भागांतील शेतकऱ्यांचा यात
समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.