वीर धरण ९२% भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वीर धरण ९२% भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

बारामती:- वीर धरणात पाणीसाठा 92 टक्क्यांवर पोहोचला असून, विसर्ग कोणत्याही वेळेस सुरू होण्याची शक्यता आहे. कार्यकारी अभियंता, निरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणातील पाणी नियंत्रणाखाली ठेवत विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

वीर धरणातील जलप्रवाह आणि पाणीसाठ्याच्या स्थितीवरून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी अत्यंत सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धरणाचे पाणीसाठा 92 टक्के असल्याने पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ किंवा घट होण्याची शक्यता कायम राहील.

पावसाचे इंटेन्सिटी आणि धरणाच्या पाण्याच्या आवकात सतत बदल होत असल्यामुळे, विसर्ग संभाव्य वक्तव्यापेक्षा आधी कधीही सुरू होऊ शकतो. त्यामुळे निरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.