
“शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची दानत दाखवली नाही, आता किमान…’, रोहित पवारांची सरकारवर टीका
गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५
Edit
मुंबई: “राज्यात अतिवृष्टीने उध्वस्त झालेला शेतकरी, सरकारची तुटपुंजी मदत, कायदा व
सुव्यवस्थेचे उडालेले धिंडवडे, आरक्षणाचे विषय, कोलमडलेली अर्थव्यवस्था,
वाढता भ्रष्टाचार आणि एकूणच निर्माण झालेली अराजकता या परिस्थितीत हिवाळी
अधिवेशन किमान तीन आठवड्यांचं होणं गरजेचं आहे, परंतु दुर्दैवाने हे सरकार
या ठिकाणी देखील पळ काढताना दिसत असून अधिवेशन केवळ दहा दिवसांचं घेण्याचा
सरकारचा प्रयत्न आहे. कोरोना काळात केंद्राच्या सूचना, सर्वत्र भीतीचे
वातावरण, कोरोना प्रसाराची भीती या पार्श्वभूमीवर जास्त दिवस अधिवेशन घेता
येत नव्हतं. त्या काळात जास्त दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस साहेब
आज गप्प का?सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची दानत तर दाखवली नाही,
आता किमान तीन आठवड्यांचं अधिवेशन घेण्याची हिंमत तरी दाखवावी”, असं रोहित
पवार यांनी म्हटलं आहे.