“आम्ही निवडणुका जिंकतो कारण…”, रामनाथ गोएंका व्याख्यानात पंतप्रधान मोदींचे ‘या’ ७ मुद्द्यांवर भाष्य
नवी दिल्ली: सत्यकथन, उत्तरदायित्व आणि वैचारिकता यांची बांधिलकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रामनाथ गोएंका लेक्चर’मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार मांडले. नवी दिल्लीत निमंत्रितांच्या उपस्थितीत हे व्याख्यान सुरू आहे. यंदा या व्याख्यानाचे यंदा सहावे वर्ष आहे. या व्याख्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या ७ महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेऊया.
इंग्रजीला विरोध नाही, पण…
या व्याख्यानात वसाहतवादी मानसिकतेबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “कोणता देश स्वतःच्या भाषांवर टीका करतो? जपान, चीन, कोरिया यासारख्या देशांनी अनेक जागतिक कल्पना स्वीकारल्या पण भाषेशी कधीही तडजोड केली नाही. म्हणूनच आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषांमधील शिक्षणावर भर देण्यात आला आहे. आम्ही इंग्रजीला विरोध करत नाही, आम्ही भारतीय भाषांना पाठिंबा देतो. मॅकॉलेच्या गुन्ह्याला २०३५ मध्ये २०० वर्षे पूर्ण होतील, याला आजपासून दहा वर्षे आहेत. म्हणून आज, या व्यासपीठाच्या माध्यमातून, मी देशाला आवाहन करतो की, पुढील १० वर्षे या वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होण्याचा आपला संकल्प असू द्या. ही दहा वर्षे महत्त्वाची आहेत.”
स्वातंत्र्यानंतर, आपण आपल्या वारशाकडे दुर्लक्ष केले
“पर्यटन क्षेत्राकडे पहा. पर्यटन वाढणाऱ्या प्रत्येक देशाला आपल्या वारशाचा अभिमान असतो. स्वातंत्र्यानंतर, भारतात उलट घडले, आपण आपल्या वारशाकडे दुर्लक्ष केले. अभिमानाशिवाय, कोणतीही गोष्ट जपता येत नाही आणि त्या गोष्टी जपल्या नाहीत, तर वारसा नष्ट होतो. पर्यटन वाढीसाठी वारशाचा अभिमान आवश्यक आहे.”