आजपासून ‘पावसाळी वारे’; आराेप-प्रत्याराेपांच्या ‘सरी’; विराेधकांचा चहापानावर बहिष्कार
चहापानावर बहिष्कार न घालता विरोधक चर्चेला आले असते तर काही गोष्टींवर चर्चा झाली असती, काही विचारविनिमय झाला असती. पण विरोधकांनी लोकांचे मुद्देच अवगत नाहीत, अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केली. त्यामुळे या अधिवेशनात कंत्राटातील कमिशन, शेतकरी कर्जमाफी, राज्यातील संभाव्य दुष्काळ या विषयांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सामना पहायला मिळू शकेल.
आम्ही अर्धवट ऑपरेशन करत नाही : एकनाथ शिंदे
आम्ही अर्धवट ऑपरेशन करत नाही, पूर्ण करतो. याचा अनुभव तुम्हाला आहे. थोडे थांबा लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेच्या खासदारदांच्या ऑपरेशन टायगरचे काय झाले या प्रश्नावर बोलताना दिले. तर ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी अगदी सदृढ आहे, असा मिश्किल टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
...तर राजीनामा देणार नाही तर काय करणार
वर्धापनदिन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुखपद सोडण्याबाबत केलेल्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओसाड गावाची पाटीलकी मी सोडतो असे म्हणणे कितपत योग्य आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ही वेळ का आली? कोण राहिलेच नाही तर राजीनामा देणार नाही तर काय करणार, असा टोला शिंदेंनी लगावला.
मी काल एक मीम पाहिला, त्यात राज ठाकरे शांतपणे झोपले आहेत, त्यावर लिहले आहे की, मला शांतपणे झोप लागते, माझ्याकडे आमदारही नाही खासदारही नाही कोणी जाण्याचा प्रश्नच नाही, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंना लगावला.